1950 पासून, दरवर्षी जानेवारी 26 रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी 1950 मध्ये भारतीय संविधान अस्तित्वात आले. नोंद घेण्यासारखा महत्वाचा मुद्दा म्हणजे 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झाला. तो दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तथापि, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला. परंतु या मोठ्या राष्ट्राचे एकीकरण आणि विविध प्रकारच्या सांस्कृतिक विविधता एकत्रित करणे हे जानेवारी 26, 1950 पर्यंत झाले नाही. म्हणजेच, जेव्हा भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंंमलबजावणी सुरू झाली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व
भारत सरकार आणि भारतीय नागरिकांसाठी प्रक्रिया, कार्य, जबाबदाऱ्या, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असलेले भारतीय संविधान हे लिखित स्वरुपाचा भव्य दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाचे मूलभूत तत्व “
लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे",यातून प्रतीत होते की, देशाचे सामर्थ्य हे भारतीय नागरिकांच्या हाती एकवटलेले आहे. प्रजासत्ताक दिन हा भारतीय नागरिकांचे स्वतःचे सरकार निवडण्यासाठी सक्षमीकरणाचा उत्सव म्हणून चिन्हांकित केला जातो. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी दिनाचे स्मरण करण्यासाठी या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्सव
- प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरते.. दिल्लीमधील व्यक्ती राजपथावरील संचलनाला हजेरी लावतात.. कडाक्याची थंडी असूनही दिल्लीकर नयनरम्य संचलन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
- भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होते आणि शौर्य पुरस्काराने शूर नागरिकांचा गौरव केला जातो- परमवीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
- भारतीय पंतप्रधान युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूर जवानांना वंदन करतात. दिल्ली येथील इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योती येथे शहीदांच्या स्मृती प्रित्यर्थ पुष्पचक्र अर्पण करतात.
- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व भारतीय सैन्याच्या तीन दलांद्वारे केले जाते - नौदल, हवाईदल आणि भूदल. याव्यतिरिक्त, अनेक सांस्कृतिक चित्ररथ, रॅली जवानांचे संचलन, मिलिटरी बँड्स, एअरक्राफ्ट शो आणि लक्षवेधी कौशल्य आणि सैन्य वाहनांवर साहसी प्रदर्शनांचा समावेश असतो.
- भारतीय शाळांमध्ये या दिवशी सुट्टी असते. परंतु विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतात आणि ध्वजारोहण, नृत्य, नाट्य आणि मिठाई वाटप करून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होतात.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे जगातील लक्षवेधी संचलनापैकी मानले जाते. दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन उत्सवांची भव्यता पाहण्यासाठी या काळात जगभरातील व्यक्ती भारताला भेट देतात. तुम्ही उत्सवाचे भव्य स्वरुप पाहण्यासाठी तुमचे तिकीट बुक केले आहेत का? त्यामुळे तुमच्याकडे असावा
ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन when you book your flight tickets so that you are financially secure when taking this memorable
trip with your family and friends.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक सदिच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक सदिच्छा
आयुष्यभराचा आनंद लुटा
सर्वोत्कृष्ट कंपनी
अमेझिंग!!
धन्यवाद
खरंच एक चांगला लेख!